प्रस्थावना
आई जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्य साकारणारे पुण्यात्मा श्री.छत्रपती शिवरायांच्या चरणी आम्ही हे कार्य समर्पित करीत आहोत. स्वराज्य ही संकल्पना संविधानाच्या माध्यमातून लोकशाही राज्य निर्माण करणारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन आणि या मातीत जन्मलेल्या सर्व क्रांतीकारकांना, स्वातंत्र्यवीरांना, मावळ्यांना मानाचा मुजरा, कर्माने जनमाणसात फिरणाऱ्या ईश्वरी अंश असलेल्या सर्व संत सज्जनांच्या चरणी नमन करुन मराठी संस्कृती, मराठी भाषा आपल्या येथील रूढी परंपरा आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संयुक्त मराठी मुंबई चळवळ सदैव प्रयत्नशील राहील ही आम्ही आपणास ग्वाही देतो. आपण कोणत्या धर्मात जन्मला आलो कोणत्या पंथात जन्माला आलो कोणत्या जातीत जन्मला आलो हे महत्वाचं नाही तर आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय हे महत्वाचे आहे म्हणून धर्म, जात, पंथ, प्रांत बाजूला ठेऊन आजपासुन ह्या महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माती साठी एकत्रीत येऊन जगाला हेवा वाटेल असे महान राष्ट्र घडवुया. – संयुक्त मराठी मुंबई चळवळ

मनोगत
माझ्या तमाम मराठी बांधवांनो,
जय शिवराय,
मुंबई महाराष्ट्राला मिळाली परंतु मराठी माणसाला मिळाली का?
१ मे १९६० रोजी भाषावार प्रांतरचना धोरणाचा भाग म्हणून स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य’ स्थापन झाले. आपण मराठीचं स्वतंत्र राज्य मिळवलं, ते मराठी भाषा, भूमिपुत्र मराठी माणसाच्या विकासासाठी आणि हे राज्य मिळवताना या मातीला आपल्या १०७ मुलांना हौतात्म्य द्याव लागलय आणि हे जर आम्ही विसरणार असू तर आम्हाला छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार कसा काय असावा. १९६० पासून २०२४ म्हणजे गेली ६५ वर्ष आम्ही आमच्या मूलभूत हक्कांच्याच लढाया लढतोय. महाराष्ट्रातील काही निवडक राजकीय नाव वघळता बहुतांश राजकीय नेते, पुढारी हे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यापेक्षा आपला परिवार, आपल्या राजकीय पक्षाला पुढे घेऊन जाण्यातच जास्त व्यस्त होते हे प्रखरषाने जाणवते. त्याचे परिणाम आता महाराष्ट्राला सहन करावे लागत आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणूस आपले स्थानिक अधिकार अबाधित ठेवण्यात कमी पडल्यामुले प्रथमतः आर्थिक नंतर सामाजिक आणि आता राजकीय क्षेत्रातही मराठी माणसाची ताकद कमी होताना दिसत आहे. १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मिळवलेला स्वतंत्र अखंड महाराष्ट्र आपण फक्त नकाशापुरताच अबाधित ठेवला आहे. प्रत्यक्षात मात्र मराठी माणसाने राजकारणाच्या माध्यमातून आपली संस्कृती, आपली माय मराठीभाषा, आपलं अस्तित्व, आपली राजकीय ताकद, आपले भूखंड खूप काही मागील ६५ वर्ष्यात गमावलं आहे. जर मराठी माणसाने ह्या गोष्टींकडे गांभीयाने लक्ष्य घालून जर आपली मानसिकता बदलली नाही तर येणाऱ्या काळात परकीय राजवटीसमोर गुलाम होऊन मान खाली घालून उभा असलेला सामान्य मराठी माणूस आपल्याला पाहायला मिळेल. इंग्रज सुद्धा व्यापार कारण्याकरिताच देशात आले १५० वर्ष येथील मुलुख पारतंत्ऱ्या त होता. आज परप्रांतीय आमदार , खासदार होण्याकरिता आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्याच मराठी माणसाच्या विरोधात दंड थोपटतात आणि काही मराठी मतदार आपल्या शुल्लक अश्या आर्थिक फायद्या करिता त्यांना निवडूनही देतात परंतु आपण आपले किती मोठे सामाजिक नुकसान करत आहोत ह्याची जाणीव करून घ्या आणि त्यादिवशी तुम्हाला कळेल आपणच आपल्या पुढील पिढ्यांच्या वर परकीय राजवट लादण्याची सुरवात करत आहोत. सध्याची स्थिती पाहता अशी कितीतरी छुपी आक्रमण माझ्या मराठी मुलखावर , माझ्या मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच करवून घेतली जात आहेत याच दुःख आहे. मराठी अस्तित्व वाचवण्याचा निर्धार घेऊन मराठीबाणा, मुंबईतील मराठी अस्तित्व कायम अबाधित ठेवण्यासाठी सर्व गिरणी कामगारांचे पुनर्वसन मुंबईतच होणे आवश्यक आहे त्याकरिता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या स्वराज्याची सेवा आणि बाबासाहेबांच्या संविधानाचे संवर्धन करण्यासाठी म्हणून संयुक्त मराठी मुंबई या सामाजिक विचारधारेची स्थापना केली आहे .

ध्येय
१)मराठी माणसाला सामाजिक, राजकीय, आर्थिक,भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे मुळ ध्येय आहे.
२)मराठी मातीला, मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला, मराठी राजकारणाला, मराठी अर्थव्यवस्थेला, मराठी परंपरेला बळकटी देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणे हे संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे एक महत्वाचे उदिष्ट आहे.
३)मराठीबाणा, मुंबईतील मराठी अस्तित्व कायम अबाधित ठेवण्यासाठी सर्व गिरणी कामगारांचे पुनर्वसन मुंबईतच होणे आवश्यक आहे त्याकरिता सर्व मराठी माणसांना सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे आणि वर्गांचे लोकांना एकत्र करून महाराष्ट्राच्या विकासाठी काम करणे हे संयुक्त मराठी मुंबई चळवळ आपल कर्तव्य मानते .
४)महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या विकासासाठी आड येणाऱ्या सर्व समस्यांची सोडवणूक करणे, या विकासाआड येणाऱ्या सर्व सत्तागट, पंथ आणि समाजगट यांच्याशी मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तरी परिणमाची पर्वा नकरता संयुक्त मराठी मुंबई चळवळ आपलं कार्य अविरतपणे सुरु ठेवेल.
५) मराठी माणसाला न्याय देताना संयुक्त मराठी मुंबई चळवळ कोणत्याही राजकीय, आर्थिक फायदा-तोट्याचा विचार नकरता फक्त आणि फक्त मराठी माणसाला केंद्रबिंदू ठेऊन कोणताही राजकीय संघर्ष, सामाजिक संघर्षात निर्भीडपणे उतरेल.
६) महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार क्षेत्रांतील सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, हि संयुक्त मराठी मुंब ई चळवळीच्या काऱ्या ची मुख्य दिशा आहे.
७) संविधानाने मराठी माणसासाठी निर्माण केलेल्या स्वतंत्र महाराष्ट्रात राजकीय,सामाजिक क्षेत्रात फक्त आणि फक्त मराठी माणसाचेच वर्चस्व असले पाहिजे हि संयुक्त मराठी मुंबई चळवळीची विचारधारा आहे.
८)शिवरायांच्या स्वराज्याला जर कोणी गिळंकृत किंवा त्यावर कोणी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असेल तर समोरील मानसिकता कुठच्याही धर्माची, पंथाची,जातीची असो संयुक्त मराठी मुंबई चळवळ अश्या मानसिकतेला मुघली मानसिकता समजून मराठी मातीत गाडण्याचे कार्य करेल.
९)संयुक्त मराठी मुंबई चळवळ संतज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, मासाहेब जिजाऊ, महाराणी अहिल्याबाई होळकर, छत्रपती शाहू महाराज, तेजसूर्य महात्मा जोतिबा फुले , माई सावित्री, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, स्वामी विवेककानंद , अन्ना भाऊ साठे या सर्व थोर पुरुषांच्या सामाजिक विचारांचे संवर्धन करून मराठी माणसाने गेल्या काळात गमावलेला आत्मसन्मान , मराठी स्वाभिमान पुन्हा माझ्या सर्वसामान्य मराठी माणसाला मिळवून देण्यासाठी परिणमाची पर्वा नकरता कार्य करेल.

आमची भुमिका

सामाजिक
सामाजिक भुमिका मांडताना एक गोष्ट प्रप्रकर्षाने सांगाविसी वाटते ती म्हणजे सामाजिक भुमिका म्हणजे समाजाबद्दल असलेली आपली भुमिका आता महाराष्ट्र म्हंटल की समाज म्हणजे फक्त आणि फक्त मराठी माणूसच केंद्रबिंदू असला पाहिजे परंतु दुर्दैवाने आज महाराष्ट्रातील व्यवस्थापन असेल सत्ताधारी असतील विरोधक, सामाजिक संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील जवळपास ह्या सर्वांनाच संथगतीने का होईना पण विसर पडत चाललाय आणि हि मराठी समाज्याला हळुहळू सामाजिक, आर्थिक आणि राजकिय दृष्ट्या गुलामगिरी कडे घेऊन जाण्याची सुरवात ठरु शकते. गिरणी कामगारही याच षडयंत्राचा बळी ठरला. मुंबईतील अधिकारासाठी त्याला संपवलं जातंय. धर्म,जात,पंथ ह्या विषयाला काहि काळ का होईन बाजूला ठेऊन मराठी माणसाने मराठी समाज्यासाठी आपल स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी एकत्रित येऊन पुन्हा महाराष्ट्र स्वतंत्र करण्याची वेळ आली आहे अन्यथा येणारा काळ सामाजिक दृष्टिकोणातुन मराठी बांधवांसाठी गुलामगिरिचा असणार हे नक्की. मराठी माणसाला वेगवेळ्या धर्मामध्ये जातीमध्ये विभाजित करुन त्याचा मुळधर्म “महाराष्ट्र धर्मा”पासून दुर घेऊन जाण्याचा महाराष्ट्र द्रोहदयांचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. मराठी हि आपली ओळख आहे ती पुसली गेली तर आपण सुद्धा १३० कोटी जनतेमधील एक असू हे विसरणे मराठी मातीला परवडणारे नाहि. आज आपल्या नावापूढे असलेल्या मराठी ह्या एका शब्दामुळे आपल्याला देशात जगात किंमत आहे हे मराठी माणसाने विसरता कामा नये. थोडक्यात काय तर मराठी हीच आपली सामजिक भुमिका असली पाहिजे. संयुक्त मराठी मुंबई चळवळ कडवटपणे कोणत्याही, राजकिय,आर्थिक,सामजिक तोट्याचा विचार न करता फक्त आणि फक्त मराठी माणसालाच आपल्या विचारधारेचा केंद्रबिंदू ठेऊन येणाऱ्या काळात समाजकारण करेल.

राजकीय
आपण एका लोकशाही संघराज्यात राहतो आणि लोकशाही म्हंटल की अनन्य महत्व येत ते राजकारणाला आणि राजकिय पक्षांना,तेथिल राजकारण आणि राजकारणीच ठरवत असतात आपल्या राज्याच्या राजकिय,सामाजिक आणि आर्थिक भुमिका त्यामुळे सामाजिक क्रांती घडवायची असेल तर आपली स्वतंत्र राजकिय भुमिका असणे अत्यंत महत्वाचे आहे आणि राजकिय विचारधारेचे महत्व लक्षात घेऊनच आम्हि मराठी राजकारणात मराठी माणसाचे कमी होत चाललेले महत्व आणि ताकद ह्यांला पुन्हा एकदा सर्वसामान्य मराठी माणसाच्या हातमध्ये बहाल करण्याचा विचार मनामध्ये घेऊन संयुक्त मराठी मुंबई या विचारधारेची स्थापना करत आहोत. महाराष्ट्रचा एकंदरीत राजकिय वारसा पाहताना एका गोष्टिची जाणिव नक्कीच होते या मराठी मुलखाला वैभवशाली अशी राजकिय परंपरा आहे. अस असल तरी सध्याची स्थिती पाहता आम्हि आमची मराठी अस्मिता, मराठी संस्कृति मराठी मायबोली, मराठी मुलखातील भुखंड अबाधित ठेवण्यात जसे कमी पडलो त्याच बरोबर राजकारणात हि आम्हि मराठी म्हणून दिवसेंदिवस कमजोर होत असल्याचे चित्र आहे. एक गोष्ट लक्षात घेण गरजेचे राजकारण हा लोकशाहिचा पाया आहे. राजकारण हा समाजाला विकासाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. आणि हेच राजकारण आपल्या मराठी माणसाच्या ताब्यात राहिल नाहि तर आपल्या मराठी समाज्याचा विकास करणार कोण खरतर ६४ वर्ष झाली स्वतंत्र महाराष्ट्र आपल्याला मिळून परंतु आजही आपण आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढतोय याला जबाबदार कोण? आपण ज्यांना इतके वर्ष निवडून दिलेले प्रतिनिधी हेच फक्त ह्या गोष्टींना जबाबदार नाहि तर आपण ह्यांना फक्त जात,धर्म,पंथ,राजकिय पक्ष ह्या मुद्यावर निवडून दिले ज्या दिवशी आपण मराठी अस्मिता, विकासाच्या मुद्यावर निवडणुकांना सामोरे जावु तेव्हा खऱ्या अर्थाने समाज विकासाच्या दिशेने वाटचाल करेल. महाराष्ट्रातील १००% उमेद्वार हे स्थानिकच असायला हवेत असा मतदार म्हणून हट्ट असायला हवा. अन्यथा आज आमदार / खासदार होणारे परप्रांतीय लोकप्रतिनिधी आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्याशीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची स्पर्धा करतील तो काळ दुर नसेल. थोडक्यात महाराष्ट्रातील राजकारण हे मराठी फक्त माणसाला केंद्रबिंदु ठेऊनच असल पाहिजे अन्यथा राजकिय गुलामगिरी मराठी माणसाला सोसावी लागेल.

आर्थिक
आर्थिक क्षेत्राचा विचार करता मराठी माणसाला आपल्याच महाराष्ट्रातील उपलब्ध आर्थिक स्त्रोतांमध्ये मराठी म्हणून स्थानिक अधिकार म्हणून संधी मिळताना दिसत नाही. सरकारी नोकरीचा विचार केला तर पाहिजे तेवढ्या भरती सरकारच्या माध्यमातून मिळत नाही. आणि खाजगी क्षेत्रामध्ये स्थानिक अधिकाराची सरळ सरळ पायमल्ली करुन बाहेरून येणाऱ्यांना संधी दिली जाते. रोजगाराचा विचार करता रिकामी शासकिय जागा / भरती करुन सरकारी नोकरीमध्ये १००% मराठी मुलांना संधी दिली गेली पाहिजे त्याचबरोबर मराठी माणसाच्या महाराष्ट्रात प्रत्येक उद्योगात खाजगी क्षेत्रात कमीतकमी ८०% संधी हि स्थानिक मराठी मुलांना मिळत असेल तरच उद्योग उभारणीला महाराष्ट्रात परवानगी देण्याच काम महाराष्ट्र शासनाने करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक उलाढालीमध्ये महत्वाचा घटक असणारा आपला शेतकरी बांधव आहे. शेतकऱ्यांसाठी काहि ठोस भुमिका सरकारने राबवणे काळाची गरच आहे. ज्या दिवशी प्रशासकीय धोरणे फक्त आणि फक्त मराठी माणसाला आपला केंद्रबिंदू ठेऊन बनवली जातील तेव्हा तो दिवस दुर नसेल महाराष्ट्रातील मराठी जनता आर्थिक सक्ष्ममीकरण्याच्या दृष्ठिने वाटचाल करेल. महाराष्ट्रात प्रथम प्राधान्य हे मराठी माणसाला विकसित करण्यासाठीच असायला हवे. सध्याच राजकारण पाहता महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमधून मराठी माणूस किंवा मराठी व्यवसायिक कसे कमी होतील ह्या अनुषंगाने प्रयत्न होताना दिसतात. मराठी माणसाला आर्थिक दृष्ट्या कमकुवत करुन महाराष्ट्रचे समाजकारण,राजकारण,अर्थकारण आपल्या हातात घेऊ पाहणाऱ्या काहि उपऱ्यांना आपण निवडून दिलेलेच काहि लोक प्रतिनिधी स्वताच्या आर्थिक , सामाजिक नफ्याकरिता मदत करताना दिसतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. आर्थिक दृष्टिकोणातुन स्थानिक अधिकार हे येथील मराठी माणसालाच असायला हवेत तरच येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मराठी माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. महाराष्ट्रातील आर्थिक उलाढालिचा एकंदरित जास्तीतजास्त फायदा हा मराठी माणसालाच होईल अश्या काही प्रशासकीय तरतुदी करण्याची गरज नक्कीच आहे. संयुक्त मराठी मुंबई चळवळ येणाऱ्या काळात मराठी माणसाला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध राहिल.