गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी आमदार सुनील प्रभू आक्रमक – सरकारला निर्णय घेण्याची मागणी
मुंबई, ६ मार्च: गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली आहे. “गिरणी कामगारांनी संपूर्ण मुंबई उभारली, मात्र आज त्यांनाच हक्काची घरे मिळत नाहीत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांत…